Wednesday, December 29, 2010

तक्रार मात्र नाही

 तुझ्या नव्या सवालाने ,शब्द वळावयास लागले ...........
  सारे छुपे अर्थ ,नव्याने कळावयास लागले ............
  नको करूस मला आता नवा सवाल ............
  जुनेच माझे प्रश्न ,मला छयलावयास लागले .............  
 
  वरवर पाहता वागणे माझे साधेच होते ...........
  खोलवर जाशील तर छुपे अर्थ दडले होते ............
  जपून मनात माझ्या,माझेच आश्रू दाटले होते ........
  लपवून हुंदक्यांना दिलखुलास हासत होते ...........

  खुला आसमंत तुझा,वारा सुसाट भरला होता ...............
  दिल्या घेतल्या वचनांचा,मला लगाम पडला होता ..............
  आणा भाका,शपथा नि नाती ,
  मी मात्र जपावे आभास किती ......................
.
  नाही तुझी सोबत,नाही माया ...........
  एकाकी हा पांगळा प्रवास किती ...........
  भव्य दिव्य स्वप्नांचे कधीच नव्हते मागणे .................
  प्रश्नालाही प्रश्न पडावा,असे नशिबी भोगणे ...............

  हे दुख नेहेमीचे,झाले जुनेपुराणे .................
  चढवुनी नवे मुखवटे,गाते नवे तराणे.................
  झाला उशीर जेव्हा,हाका तुला दिल्या मी ................
  सांजवेळ झाली आता,पहाटेच पुकारले मी ..................

  मी एकटीच माझी असते कधी कधीही ..............
  गर्दीत भोवतीच्या,नसते कधी कधी मी .....................
  जपते मनात माझ्या हळुवार हुंदका हा .................
  लपवून आसवांना हसते कधी कधी मी ...............
.
  तू भेटलास जेव्हा,मी बोललेच नाही .................
  झाला उशीर आता ,तक्रार मात्र नाही ................
                            तक्रार मात्र नाही ..................... 
                                                                     मीना

कोड पडलय मला

कोड पडलय मला सोडवाल का कुणी ?
माणसं अशी का वागतात ,शोधाल का कुणी ?

आयुष्याच्या नव्या वळणावर ,नवे लोक भेटतात
जन्मोजन्मीचा ऋणानुबंध ,असा जीव लावतात ,

मात्र एखाद्या क्षणी सहज सहज विसरतात ,
रक्ताचे तर नाही,म्हणून कवडीमोल ठरवतात ,

गरज म्हणून नात जोडतात का कुणी ?
सोय म्हणून सहज तोडतात का कुणी ?

विश्वास आणि प्रेम,नसते मागणे काही ,
समाधानाच्या तराजूत व्यवहार मात्र नाही ,

मिळेल तितके द्यावे,नि जमेल तितके घ्यावे ,
दिले घेतले सरेल ,तेव्हा ओंजळीत काय राहावे ?

नात हे ओझ नाही ,मनापासून समजून घे ,
भावनांचे मोल आणि समाधान उमजून घे ,

मैत्री नि प्रेम हळुवार नि तरल ,जपले नाही जीव लाऊन
तर होत जाईल विरळ ........श्वासाचे अंतर नि हृदयाचे स्पंदन ,
ओंजळीतली वाळू जणू सहज जाईल गळून ...........
मीना

अभ्यास अभ्यास

अभ्यास अभ्यास .......रोज रोज अभ्यास ........
आई आणि बाबांना पडलाय एकच ध्यास........
सारखा सारखा अभ्यास नकोसे वाटते ........
नाही केला एक दिवस तर काय मोठे बिघडते ?????

मलाही खूप खूप खेळावेसे वाटतंय ......
अभ्यासाला बुट्टी मारून लोळावेसे वाटतंय ......
कोपर्यावरचा वडापाव चापावासा वाटतोय .....
मस्तपैकी सिनेमा बघावासा वाटतोय .........

दादा झाला एन्जिनिएर,ताई होईल डॉक्टर ......
खर खर सांगू ?मला व्हायचंय actor .........
वेगळी वाट चालायची इच्छा आहे माझी ....
पण आई बाबांचे डोळे पाहून स्वप्न थिजतात माझी ............

८० टक्के पडले कि ९० टक्के पडले ..............
यांच्या मात्र अपेक्षांचे ओझे फारच वाढले ...........
ओझ्यापाई ,खांदा वाकून गेलाय माझा ..........
स्वप्नांच्या पंखाला तर नाहीच उरली जागा ......

मोठ्यांच्या या इच्छ्ये पायी भरडून निघतंय मन ........
कधीतरी वाटते नको नको हे जीवन ..............
एवढी मुले करतात .....करावा का ट्राय........
आपणही आत्महत्येचा निवडावा का पर्याय ????????

एक क्षण असा आला वाटले आता सुटले ............
अभ्यासाच्या जाचातून सुटका होईल हे पटले ...........

केला मी निश्चय,ठरवला प्लान.........
मदतीसाठी निवडला गरगरणारा फ्यान ...............
बांधायला त्याला हवी होती साडी ............
आईच्या कपाटातून उचलली एक घडी ............

नजरेला दिसला आई बाबांचा हसरा फोटो ............
शप्पथ सांगते नाही सांगत खोटं..........
आई बाबांच्या डोळ्यात पहिली मी माया ......
खूप केलाय माझ्यासाठी जाईल कि हो वाया .......

Flashback झाला ,आठवले सारे .........
क्षणभर डोळ्यासमोर चमकलेच तारे ...............
आठवले प्रेम आठवला स्पर्ष्य............
डोळ्यामध्ये त्यांच्या पहिला मी हर्ष ............

माझे यश बघण्यासाठी कणकण झीज्लेत ...........
किती किती घाव मनावर सोस्ल्येत .............
क्षणात उमगली माझी मला भूल .............
याच का सव्स्कारांचा बांधलाय त्यांनी पूल ............

पटकन उठले नि धावत सुटले .............
आईच्या कमरेला मारली मिठी ..............
नजरेच्या कोपऱ्यात दिसले बाबा .............
अन डोळ्यांतून अश्रूंचा वाहिला धबधबा ..........

दोघांनीही प्रेमानी घेतले मला जवळ .............
पळूनच गेले माझ्या मनातील मळभ ...........
वचन दिले स्वत्हालाच होणार मी मोठी ...............
मीच तर आहे यांची म्हातारपणीची काठी ............................